Top News

जाणून घ्या मृत्यूच्या दिवशी दिव्या भारती सोबत काय झाले होते ?

 


एक्स्प्रेस मराठी : बॉलीवूड मध्ये दिव्या भारती (Divya Bharti) सारखी क्वचितच कोणी अभिनेत्री असेल ते जिने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच 12 चित्रपट केले जे प्रचंड हिट झाले. माझा पुढच्याच वर्षी तिच्या आयुष्याची अखेरची झाली. दिव्या भारतीचे नाव निघताच ऐसी दिवानगी आणि सात समंदर पार यांसारखी गाणी आठवतात. शाहरुख खान सोबत दिवाना सिनेमात तिने केलेला रोमान्स आठवतो आणि त्यासोबतच आठवते काळीज पिळवटून टाकणारी तिच्या मृत्यूची बातमी. 25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्म झालेल्या दिव्या भारतीचे 5 एप्रिल 1993 रोजी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झालं मुंबईतील राहत्या इमारतीच्या खिडकीतून पडून तिचा अकाली मृत्यू झाला मात्र तिने आत्महत्या केली की अपघाताने खाली पडली की तिच्या सोबत हात घातपात झाला हे कोडं तिच्या मृत्यूच्या 28 वर्षांनंतरही उलगडलेला नाही आणि कदाचित हे कायमस्वरूपी एक रहस्यच राहिल. दिव्या भारतीच्या प्रवासावर आपण या लेखात नजर टाकणार आहोत. दिव्या भारती ने 1992 मध्ये विश्वात्मा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्याआधी तिने तेलगू चित्रपट केलं विश्वात्मा सिनेमातील सात समंदर पार मे तेरे पीछे पीछे आ गई हे गाणं प्रचंड गाजल. या गाण्याने दिव्याला मोठे यश मिळवून दिले. आजही ते गाणं रसिकांच्या ओठांवर आहे त्यानंतर दिव्याने सलग दहा हिंदी चित्रपट केले जे ओळीने हीट झाले  यामध्ये शोला और शबनम दिल का क्या कसूर जान से प्यारा दीवाना बलराम दिल ही तो है दिल आशना है गीत यांसारख्या सिनेमांचा समावेश वर्षभरातच तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सुरुवात केली ती त्या काळातील सर्वात लोकप्रिय सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.



साजिद नाडियाडवालाशी विवाह : दिव्या भारती जेव्हा शोला और शबनम चे शूटिंग करत होती तेव्हा चित्रपटाचा नायक गोविंदाने तिची ओळख आपला मित्र दिग्दर्शक निर्माता साजिद नाडियाडवाला सोबत ओळख करून दिली. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 10 मे 1992 रोजी दोघांनी लग्न केले पण तीची बहरती चित्रपट कारकीर्द लक्षात घेत लग्नाचा फारसा गाजावाजा करण्यात आला नाही आणि तिने  इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचं नाव सना नाडीयाडवाला असं ठेवण्यात आल. 1993 मध्ये दिव्याचे फक्त 3 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते क्षत्रिय रंग आणि शतरंज कारण हे दिव्याच्या आयुष्यातील शेवटचे वर्ष यापैकी दोन सिनेमे तर तिच्या मृत्युनंतरही झाले कारण लग्नानंतर जेमतेम वर्षभरातच तिन्ही जगाचा निरोप घेतला.

मृत्यूच्या कारणांचा ऊहापोह (Divya Bharti Death Casue) : दिव्याच्या आकस्मिक मृत्यू मागे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते कोणी याला आत्महत्या मनात कोणी हा अपघात असल्याचं सांगतात तर काही जणांनी तिच्या पतीलाही यासाठी जबाबदार ठरवलं. बरीच वर्ष तपास करूनही पोलीस अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि 1998 मध्ये ही केस बंद करण्यात आली. पण त्या रात्री नेमकं काय झालं दिव्या चा मृत्यू कसा झाला आणि मृत्यूच्या काही तासांपूर्वी जर दिव्या इतके आनंदी होती तर तिने मृत्यूला कवटाळले असे अनेक प्रश्न विचारले गेले त्यातील बहुतेक अनुत्तरितच राहील.

त्याच दिवशी नवीन फोर बीएचके फ्लॅट ची खरेदी : आपल्या मृत्यूच्या दिवशीच दिव्यानी मुंबईत स्वतःसाठी नवीन फोर बीएचके घर विकत घेतलं होतं आणि करार अंतिम झाला होता आणि दिव्याने तिचा भाऊ कुणाला ही आनंदाची बातमी दिली होती. त्याच दिवशी शूटिंग संपवून चेन्नईहून मुंबईला परतली होती तिच्या पायाला ही दुखापत झाली होती

काय घडलं त्या रात्री : मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागातील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर दिव्या पतीसह राहत होते तिच्या घरी रात्री दहा वाजता च्या सुमारास तिची मैत्रीण आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला पती शाम यांच्यासह भेटायला आले होते. तिघे लिविंग रूम मध्ये बसून गप्‍पा मारत होते सोबतच मद्यपान हे सुरू होता दिव्याची आजची मोलकरीण अमृता ही गप्पांमध्ये सहभागी होती. काही मिनिटांनंतर भयंकर असं काही घडेल याची पुसटशी कल्पनाही तेव्हा कोणाला नसावी. रात्रीचे अकरा वाजले होते .अमृता काहीतरी काम करण्यासाठी किचन मध्ये गेली मी त्याला तिच्या पतीसोबत टीव्ही पाहण्यात व्यस्त होते त्याच वेळी दिव्या हॉलच्या खिडकीच्या दिशेने गेली आणि तिथून अमृताशी मोठ्या आवाजात बोलत होती दिव्याचे लिविंग रूम मध्ये बालकणी नव्हती पण ती एकमेव खिडकी होती त्याला ग्रील नव्हतं. त्याच खिडकीखाली पार्किंग ची जागा होती तिथे बरीच वाहनं उभी राहत असत.

पाचव्या मजल्यावरून खाली पडली : त्या दिवशी पार्किंगमध्ये एकही गाडी उभी होती खिडकीत उभी असलेली दिव्या वळली आणि तिने नीट उभे राहण्याचा प्रयत्न केला मात्र इतक्यात तिचा पाय घसरला आणि दिव्या सरळ खाली जमिनीवर पडलीअसा दावा केला जातो. त्या मजल्यावर खाली पडल्याने दिव्या पूर्णपणे रक्ताने माखली होती तिला तातडीने कपूर रुग्णालयात नेण्यात आला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दिव्या चा मृत्यू झाला. डोक्याला झालेली दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली पाच वर्ष तपास करूनही पोलिसांना तिच्या मृत्यूचे कोणतेही ठोस कारण सापडलं नाही परिणामी ते दारूच्या नशेत असल्याने बाल्कनीतून खाली पडली असे कारण पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. दिव्याचा  मृत्यू हत्या होता अपघात की आत्महत्या हे रहस्य आज पर्यंत उलगडलेले नाही. जर ती नाराज होती तर तिने स्वतःला साठी घर का खरेदी केले असेल असा प्रश्न उपस्थित झाला होता मग खरोखरच तिच्या पतीने हत्येचा कट रचला होता का ? असंही त्या वेळी विचारलं जायचं या प्रश्नांची उत्तरं दिव्या सोबतच लुप्त झाली पण काही असो दिव्या भारती आजही प्रत्येक चाहत्याच्या हृदयात विराजमान आहे हे नक्की.

तर कशी वाटली की माहिती आम्हाला नक्की कळवा कमेंट्स मध्ये. 🙏

Post a Comment

Previous Post Next Post